अहमदनगर (प्रतिनिधी)- अवकाळी पावसाने झालेले नुकसान, दुधाचे घसरलेले भाव, कर्जमाफीपासून वंचित राहिलेले शेतकरी व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी यासह अनेक मागण्यांसदर्भात नगर तालुका भाजपने तहसील कार्यालयासमोर आज मंगळवारी जागरण गोंधळ घातले. तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर भाजपचे जागरण गोंधळ आंदोलन संपले.
तालुकाध्यक्ष मनोज कोकाटे, जिल्हा सरचिटणीस दिलीप भालसिंग, जिल्हा उपाध्यक्ष शामराव पिंपळे, प्रदेश पदाधिकारी युवराज पोटे, रमेश पिंपळे, दिपक कार्ले, अर्चना चौधरी, नंदा चाबुकस्वार, मोहन गहिले, यांच्यासह बाप्पूसाहेब बेरड, भाऊसाहेब काळे, महेश लांडगे, राजू दारकुंडे, प्रशांत गहिले, गोवर्धन शेवाळे, सागर भोपे, नानासाहेब बोरकर, उमेश डोंगरे, शामराव घोलप, सुभाष निमसे, पोपट शेळके, कांबळे सर, देविदास आव्हाड, बबन शिंदे, गणेश भालसिंग, भाऊसाहेब लगड, सुनील लगड, राहुल शिंदे,पोपट साठे, संदीप म्हस्के, बाळासाहेब ठोंबरे, प्रशांत कांबळे, शुभम शेळके, विजय गाडे, सचिन बोरुडे, राहुल गुंड, दत्ता वाडेकर या अनोख्या आंदोलनात सहभागी झाले होते.
तालुकाध्यक्ष कोकाटे यांनी राज्य सरकारवर कडकडून टीका करत राज्य सरकार हे अत्यंत निष्क्रिय स्वरूपाचे सरकार असून या सरकारला शेतकर्यांचे घेणेदेणे नाही. महाविकास आघाडी सरकार फक्त प्रशासनातील अधिकार्यांच्या बदल्या करण्यातच आनंद मानत आहे. कोरोनाग्रस्त परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना राज्य सरकार व प्रशासन अतिवृष्टी, कर्जमाफी, दूध दरवाढ याबाबत फक्त बघ्याची भूमिका घेत आहे. नगर तालुक्यातील फक्त दोन महसूल मंडलातील पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले असून बाकी मंडलात पंचनामे करण्याचे आदेश दिलेले नाहीत, हे तालुक्याचे दुर्भाग्य असल्याचे कोकाटे म्हणाले.
नगर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकर्यांना पंचनामे न करता आर्थिक मदत करावी, दुध दरवाढ करावी तसेच कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी करावी व पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील त्रुटी दूर करून शेतकर्यांना ताबडतोब मदत मिळवून द्यावी अशी मागणी या वेळी निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागण्या तत्काळ मान्य न झाल्यास तालुक्यातील शेतकर्यांना सोबत घेऊन भाजप रस्त्यावर उतरले असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.