<p><strong>पाचेगाव |वार्ताहर| Pachegav</strong></p><p>जिल्हाधिकारी यांनी 15 एप्रिलपर्यंत सर्व आठवडे बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले. मात्र गेल्या मंगळवारी (30 मार्च) पाचेगावात जागा बदलून बाजार भरवला गेला.</p>.<p>स्थानिक प्रशासनाने यास कोणतीच आडकाठी आणली नाही. या प्रकारामुळे करोना प्रसार रोखला जाणार कसा? असा प्रश्न पडला आहे.</p><p>गावात नागरिक विना मास्क व सोशल डिस्टर्न्सींज्ञ वापर करताना दिसत नाही. पाचेगावात मागील आठवड्यात आठवडे बाजार बंद सांगण्यात आला असताना देखील बाजाराची जागा बदलून व्यापारी वर्गाने बाजार भरवला. विनामास्क व सोशेल डिस्टन्सचा वापर करण्यासाठी स्थानिक प्रशासनाने याबाबत काहीतरी निर्णय घेण्याची गरज असताना, कोणतीही भूमिका घेतली नाही.</p><p>पाचेगावात सकाळी बाजारतळावर गर्दी उसळत आहे. ही गर्दी थांबविण्याकरिता ग्रामपंचायत प्रशासनाने योग्य तो निर्णय घेऊन विनाकाम व विनामास्क नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली पाहिजे.</p><p>बाजारकरू व व्यापारी वर्ग, शेतकर्यांना गल्लीबोळात फिरून आपला भाजीपाला विकण्यास सांगावे. त्यामुळे गर्दी होणार नाही. गावातील किराणा दुकान, शीतपेय व इतर दुकानांना वेळ लागू करण्यात यावी. गावातील दारू दुकानांवर अंकुश ठेवण्यात यावा. गावातील जुगार व मटका हे देखील बंद करण्यात यावे. </p><p>गावातील नागरिकांनी करोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा, गावात गर्दी टाळावी. वेळोवेळी मास्कचा वापर करावा व वेळोवेळी हात स्वच्छ धुवावेत सॅनिटायजरचा वापर करावा,असे नागरिकांनी अंमलात आणले तर मोठी मदत होईल व पुढील अनर्थ टळला जाऊ शकेल.</p>