राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
जलजीवन मिशन कार्यक्रमाअंतर्गत राहुरी तालुक्यातील 11 गावांतील योजनांना प्रशासकीय मान्यता मिळालेली असून लवकरच उर्वरित प्रक्रिया पूर्ण होतील, अशी माहिती राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
या पाणीपुरवठा योजनांसाठी सुमारे सात कोटी 82 लाख 91 हजार 647 रुपये खर्च येणार आहे. यात राहुरी तालुक्यातील तमनर आखाडा 30 लाख 59 हजार पाचशे 35 रुपये, केंदळ बुद्रुक 53 लाख 48 हजार 330, आरडगाव 79 लाख 95 हजार 856, 72 लाख 32 हजार केंदळ खुर्द, 65 लाख 37 हजार 177 रामपूर, 30 लाख 24 हजार 673 तांदूळनेर, 98 लाख 32 हजार 540 वाघाचा आखाडा, एक कोटी 17 लाख 47 हजार 102 डिग्रस, 59 लाख 89 हजार 954 चिंचाळे, 99 लाख 35 हजार 394 मोमीन आखाडा, 78 लाख 89 हजार 55 असा खर्च गृहीत धरण्यात आला असून त्यासाठी 7 कोटी 82 लाख 91 हजार 647 रुपये खर्च आला.
यासाठी तांत्रिक मान्यता मिळालेली आहे. लवकरच प्रशासकीय मान्यता मिळताच जलजीवन मिशन कार्यक्रमाद्वारे घरोघरी शुद्ध पिण्याच्या पाणी पुरवठा होणार असल्याचे मंत्री तनपुरे यांनी स्पष्ट केले. राहुरी विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांची मालिका सुरूच ठेवलेली असून रस्ते, वीज, पाणी या कामांसाठी आपण नेहमीच प्रयत्नशील असल्याचे सांगत रस्त्याच्या कामांना सर्वाधिक प्राधान्य देण्यात आले असल्याचे नमूद केले.