अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmednagar
जिल्ह्यातील ५८ रुग्णांनी करोनावर मात केली आहे. आज त्यांना हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
यामध्ये नगर ग्रामीण ६, नगर शहर ५, राहाता १, पाथर्डी १४, कॅन्टोन्मेंट ०५, संगमनेर १६, श्रीगोंदा ६, जामखेड ३, श्रीरामपूर ०२ रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण करोनामुक्त रुग्णाची संख्या १२९१ इतकी झाली आहे.