फेरपरीक्षा लांबणीवर!

फेरपरीक्षा लांबणीवर!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

दहावी बारावीत नापास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागामार्फत दहावी आणि बारावी परीक्षेत नापास होणार्‍या विद्यार्थांची फेरपरीक्षा निकालानंतर तातडीने घेण्यात येते.

परंतु यंदा ही परीक्षा करोनामुळे लांबणीवर गेली आहे. ही परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.यंदा करोनामुळे दोन्ही परीक्षांचे निकाल विलंबाने जाहीर झाले. मात्र करोनामुळे शाळांमध्ये क्वारंटाइन सेंटर असल्याने प्रत्यक्ष शाळा सुरू नाहीत. यामुळे या परीक्षा घेणे अशक्य आहे. या परीक्षा ऑक्टोबर मध्येही घेणे अशक्य असल्याचे, समजते.

दहावीमध्ये 1 लाख 25 हजार विद्यार्थी तर बारावीमध्ये 1 लाख 80 हजार विद्यार्थी नापास झाले आहेत. या विद्यार्थांची फेरपरीक्षा घेण्याचा कोणताही निर्णय मंडळाने जाहीर केलेला नाही. त्यामुळे या परीक्षा कधी होतील, हे आता सांगता येणार नाही, असे मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com