<p><strong>नाशिक | Nashik (प्रतिनिधी)</strong></p><p>सर्व शिक्षण संस्था आणि महाविद्यालयांत प्रत्यक्ष वर्ग भरवण्यास लवकरच परवानगी देण्यात येणार आहे. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. तसेच महाविद्यालये उघडण्यासंदर्भात चर्चा केली.</p>.<p>या बाबतचा निर्णय घेण्यासाठी सर्व कुलगुरूंची बैठक बोलावली आहे. त्यात कॉलेजांचे वर्ग भरवण्यासंदर्भात सविस्तर करण्यात येईल. त्यासंदर्भातला निर्णय दोन दिवसांत घेतला जाणार आहे.</p><p>‘महाविद्यालये उघडण्यासंदर्भात आमची तयारी आहे. मात्र राज्य सरकार निर्णयच घेत नाही. आपण कुलपती या नात्याने हस्तक्षेप करावा’, असा आग्रह सर्व कुलगुरूंनी राज्यपाल यांच्याकडे केला होता. तरी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचा निर्णय होत नव्हता. मात्र आता एक ते दाेन आठवड्यात महाविद्यालयीन वर्ग भरवले जाण्याची शक्यता आहे.</p><p>राज्यात सार्वजनिक व खासगी अशी एकूण ६२ विद्यापीठे आहेत. त्याच्या अधिपत्याखाली चार लाख ५७१ कॉलेजे असून, दोन हजार २६२ स्वायत्त शिक्षण संस्था आहेत. त्यामध्ये २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ४२ लाख ६० हजार विद्यार्थी शिक्षण घेत असून शिक्षकांची संख्या १ लाख ५८ हजार इतकी आहे.</p>