नांदगाव | प्रतिनिधी | Nandgaon
देशातील रेल्वे फाटक बंद करून रेल्वे प्रशासनाने देशात अंडरपासची (Underpass) निर्मिती केली. मात्र संपूर्ण देशात अंडरपास संकल्पना फेल ठरली आहे...
रेल्वेच्या अंडरपासमध्ये पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पायी चालणाऱ्या महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुलांना रेल्वे रुळ ओलांडताना जीव धोक्यात घालून नादंगाव शहरात प्रवेश करावा लागत आहे.
लेंडी नदीच्या पुलासंदर्भात रेल्वे प्रशासनाने वेगाची मर्यादा १५ ते २० किमी ठेवण्याचे आदेश दिले होते. त्याचे पालन करण्यात यावे, अन्यथा रेल्वे गेट पुन्हा सुरू करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.