<p><strong>नाशिक l Nashik</strong></p><p>देशातील लोकांना लसीचे महत्त्व सांगण्यासाठी भारतात १६ मार्च राष्ट्रीय लसीकरण दिन म्हणून साजरा केला जातो. १६ मार्च २००५ मध्ये पोलिओचा पहिला डोस भारतात देण्यात आला.</p>.<p>त्यामुळे हा दिवस राष्ट्रीय लसीकरण दिन साजरा करतात. भारत पोलिओ मुक्त झाला असला तरी आता करोनाविरुद्ध लढा सुरु आहे.</p>.<p>करोनावरील लसीकरणाला १६ जानेवारीपासून सुरुवात झाली. पहिल्या टप्य्यात करोना युद्धांचे लसीकरण करण्यात आले. त्यानंतर १ मार्चपासून ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण केले जात आहे.</p>.<p>लसीकरण केल्यानंतर या सर्वांचे अनुभव एकच आहे, आम्ही कोरोनाची लस घेतली. आम्ही काहीही त्रास झाला नाही. तुम्हीही बिनधास्त लसीकरण करुन घ्या...</p>