नाशिक | Nashik
नाशिक जिल्ह्यात काही भागात गेल्या दोन दिवसापासून वातावरणात (atmosphere) कमालीचा बदल झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांसह हातावर पोट असणाऱ्या सामान्य जनतेची चिंता वाढली आहे...
नाशिक जिल्ह्यातील बागलाण कळवणसह अन्य काही ठिकाणी तालुक्यांमध्ये वातावरण बदलामुळे अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
बागलाणच्या पश्चिम पट्ट्यात या अवकाळी पावसाने (rain) धडक दिल्यामुळे मुल्हेर, कांद्याचामळा (Onion) या गावांसह, कळवणच्या अंबुर्डी, चनकापूर, बोरदैवत परिसरात पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला गहू (Wheat), हरबऱ्यासह आंबा मोहराला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमुळे शेतकरी पुन्हा अस्मानी संकटात सापडला असल्याने परिसरातील शेतकरी (farmer) हवालदिल झाला आहे.
अचानक आलेल्या या पावसामुळे परिसरातील कांदा आणि अन्य पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे, त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे.
दोन दिवसापासून असलेले खराब वातावरण लवकरच निवळले नाही तर कांदापीक धोक्यात जाईल त्याबरोबरच आंब्याचेही मोठे नुकसान होईल.