<p><strong>नाशिक । प्रतिनिधी </strong></p><p>नाशिक जिल्ह्यात करोनाचा वाढता विळखा लक्षात घेता त्र्यंबकेश्वरला येत्या २९ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाकडून ४ एप्रिलपर्यंत मंदिरदेखील बंद ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती आज मंदिर प्रशासनाकडून देण्यात आली...</p>.<p>दररोज प्रमाणे मंदिरात पूजा अर्चा होणार असून भाविकांना मात्र दर्शनासाठी पूर्णपणे मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. </p><p>येथील प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार व व्यापारी यांच्यात एक बैठक काल पार पडली. या बैठकीत त्र्यंबकेश्वरमध्ये जनता कर्फ्यूबाबत निर्णय घेण्यात आला होता.</p><p>त्र्यंबकमध्ये सध्या ८६ रुग्ण करोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील करोनाचा एकदा बघता सावधानता म्हणून त्र्यंबकेश्वरमध्ये जनता कर्फ्यूची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. </p><p>जनता कर्फ्यूदरम्यान मेडिकल व दूध विक्री वगळता इतर सर्व सुविधा बंद राहतील असे नियोजन करण्यात आले आहे. </p>