<p><strong>नाशिक । प्रतिनिधी Nashik</strong></p><p>उत्तर भारतात बर्फवृष्टीमुळे आलेल्या शितलहरीचा प्रकोप महाराष्ट्रात जाणवत आहे. परिणामी गेल्या तीन -चार दिवसापासून मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट आज काहीशी कमी झाली.</p>.<p>राज्यात किमान तापमान 7 वरुन काल (दि.25) 9 अंशावर आले आहे. नाशिक जिल्ह्यातील पारा 8.2 वरुन 10.6 अंशावर वर आला आहे. निफाडचा पारा 11 अंशावरआला. यामुळे थंडीची तीव्रता कमी झाल्याने शेतकर्यांना दिलासा मिळाला आहे.</p><p>जम्मु काश्मिर पासुन उत्तराखंड पर्यत उत्तरेत बर्फवृष्टी सुरु आहे. यामुळे निर्माण झालेल्या शितलहरीचा प्रकोप शेजारील राज्यांना जाणवत आहे. परिणामी राज्यात विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसात थंडीची लाट आली आहे. अनेक ठिकाणी किमान तापमान 7 ते 8 अशांपर्यत खाली आले होते. उत्तर महाराष्ट्रात नाशिकला दि.23 रोजी किमान तापमान 8.2 अंशापर्यत व निफाड याठिकाणी 6.5 अंशावर पारा खाली आला होता.</p><p><em><strong>प्रमुख शहरांचे तापमान</strong></em></p><p>गोंदिया 9.4</p><p>नागपुर 10.1</p><p>नाशिक 10.6</p><p>परभणी 11.9</p><p>पुणे 11.9</p><p>मालेगांव 12.4</p><p>अकोला 11.4</p><p>जळगांव 13.0</p>