राष्ट्रवादीची विचारधारा विकासाला पोषक

एमआयएम आमदारामुळे शहर विकासाला खीळ : आसिफ शेख
राष्ट्रवादीची विचारधारा विकासाला पोषक

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress) राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार (sharad pawar) यांच्या विचारधारेची अंमलबजावणी करूनच राज्याचा विकास होईल व सर्वसामान्य माणसाला न्याय मिळू शकेल,

असा विश्वास व्यक्त करत शहराच्या सर्वांगिण विकासाला गती देण्यासाठी आगामी महापालिका निवडणुकीत (Municipal election) राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन महानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आ. आसिफ शेख (former mla asif sheikh) यांनी केले.

मालेगावचे (malegaon) माजी आमदार शेख रशीद, महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांच्यासह 28 नगरसेवकांनी नुकताच उपमुख्यमंत्री अजीत पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील (jayant patil), पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) व अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक (Minority Development Minister Nawab Malik) यांच्या उपस्थितीत मुंबई (mumbai) येथील राष्ट्रवादी भवनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला.

त्यानिमित्त काल (दि. 4) सायंकाळी महानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माजी आ. आसिफ शेख यांच्या हस्ते अली अकबर रूग्णालय (Ali Akbar Hospital) प्रांगणात राष्ट्रवादीत सामील झालेल्या सर्वांचा नागरी सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्थानिक एमआएमचे आमदार मौलाना मुफ्ती (MIMI MLA Maulana Mufti) यांच्यावर टीकास्त्र सोडले. एमआयएमचे स्थानिक आमदार निक्रिय असून ते खोटी विधाने करून शहरवासीयांची फसवणूक करीत आहेत.

त्यांच्या कारकीर्दीत शहराचा विकास कुंठीत झाला आहे. शहरवासीयांनी 2009 ते 2014 पर्यंत व 2019 पासून आजपर्यंत स्थानिक आमदारच्या कालावधीत झालेल्या विकासकामांची माहिती घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. मागील 30 वर्षांपासून शहरात शांतता आहे. परंतु काही दिवसांपासून शहरात काही राजकीय पक्षांतर्फे शांतता भंग करण्याचा प्रयत्न होत आहे. सर्वांनी याकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच (Nationalist Congress) शहराचा विकास व यंत्रमागधारकांच्या विविध अडचणी दूर करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना महापौर ताहेरा शेख (Mayor Tahera Sheikh) यांनी, शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम घेऊ, अशी ग्वाही देत शहरवासीयांनी आगामी महापालिका निवडणुकीत (election) राष्ट्रवादी काँग्रेसला एकहाती सत्ता द्यावी. राज्यात विकासकामे करणार्‍या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहराच्या विकासाची हमी आम्ही आपल्याला देत आहोत, असे सांगितले.

कार्यक्रमास स्थायी समिती सभापती जफर अहमद अहमदुल्लाह, पक्षाचे समन्वयक शकील जानी बेग, राजेंद्र भोसले, एजाज उमर, अस्लम अन्सारी, इरफानअली आबीदअली, नजीर फल्लीवाले, अजीज मुल्ला, शकील शहा, नईम मिर्झा, अन्वर भिवंडीवाले, मनमोहन शेवाळे, यास्मीन सय्यद, अ‍ॅड. सुचिता सोनवणे, सायना अन्सारी, सबा कौसर, तबस्सूम शेख आदिंसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व बहुसंख्य नागरीक उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच राज्याचा विकास करू शकते, असा विश्वास असल्यामुळेच आपण राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. आता आपले चिन्ह घड्याळ असून सर्वांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी मनपा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यावे. स्थानिक एमआयएम आमदारांच्या निष्क्रियतेमुळे शहराच्या विकासाची गती मंदावली आहे.

शेख रशीद माजी आमदार, मालेगाव

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com