कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी

खा. डॉ. पवार यांची वाणिज्य मंत्री गोयल यांच्याकडे मागणी
कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी

नाशिक । Nashik (प्रतिनिधी)


कांद्यावरील निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी, अशी मागणी खा.डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांची भेट घेतली.या संदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन विचार विनिमय करुन निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ म्हणून नाशिकची ओळख आहे. नाशिक जिल्ह्यातील माझ्या दिंडोरी लोकसभा मतदार संघात बहुसंख्य शेतकरी कांदा उत्पादक असून येथे मोठ्या प्रमाणात दर्जेदार कांदा पिक घेतले जाते.

येथील शेतकऱ्यांची त्यावर अवलंबून असलेल्या व्यापारी वर्गाची संपूर्ण अर्थव्यवस्था ही कांदयावर अवलंबून आहे. सध्या भरपूर प्रमाणावर कांदा शेतकऱ्यांकडे पडून आहे. व्यापारी वर्गाने खरेदी केलेला कांदा हा निर्यातीसाठी सीमेवर अड़कुन पडला आहे. त्यासाठीहि सीमा खुली करावी. कांद्याच्या किमती खुप वाढल्या नसून अजूनही सर्वसामान्य माणसांच्या आवाक्यात असल्याने तातडीने निर्यात बंदी उठवने गरजेचे आहे.

आधीच लॉकडाउनच्या संकटकालातुन शेतकरी वर्ग, व्यापारी वर्ग, वाहतूकदार हे आता कुठे सावरत असतांना ही अचानक केलेली निर्यातबंदी त्यांच्यासाठी घातक ठरेल व त्यांचे मोठे नुकसान होईल.

याचा सहानुभूतिपूर्वक विचार करुन आपण कांदयावरची निर्यातबंदी त्वरित उठवून शेतकरी, व्यापारी, वाहतुकदार यांना दिलासा द्यावा, असे निवेदन खा.डॉ.भारती पवार व खा. डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना दिले लवकरच या संदर्भात वरिष्ठ स्तरावर बैठक घेऊन विचार विनिमय करुन निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com