पेठ | Peth
पेठ, तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यात मिशन जलपरिषद मोहीम अंतर्गत श्रमदानातून वनराई बंधारे बांधण्यात येत आहेत.
उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्या सोडविण्यासाठी आमलोण (ता.पेठ) येथील शिक्षक रवी भोये तसेच तरुणांनी या मोहिमेत सहभाग घेत वनराई बंधाऱ्यांची निर्मिती केली आहे.
पेठ तालुका कृषी विभागाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी अरविंद पगारे, मंडळ कृषी अधिकारी मुकेश महाजन, कृषी पर्यवेक्षक विनायक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग, जलपरिषद तसेच तरुणांच्या श्रमदानातून अजून पाच वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत.
यावेळी जलमित्रांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.