<p><strong>नाशिक । प्रतिनिधी</strong></p><p>दिल्लीत गेल्या सात दिवसापासून शेतकरी आंदोलन करत आहेत.नवीन कृषी कायदे शेतकरी विरोधी आहे.त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता आहे.या मागण्यांसाठी हे आंदोलन होत आहे.</p>.<p>या शेतकऱ्यांना सक्रिय पाठिंबा देण्यासाठी गुरुवारी (दि.३) राज्यभर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रात्रभर लोकशाही, व शांततेच्या मार्गाने बसून आत्मक्लेश करणार आहे,अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी दिली.</p><p>याचाच एक भाग म्हणून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर देखील सायंकाळी 7 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी रात्रभर जागर करणार आहे. सगळे कार्यकर्ते भाकरी चटणी सोबत घेऊन येऊन तिथेच जेवण करतील व संपूर्ण रात्र तिथेच घालवणार आहे.</p><p>या आंदोलनात कलावंत देखील येऊन पाठिंबा देणार आहेत.यात शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष साहेबराव काका मोरे, राजू शिरसाठ, सुधाकर मोगल, परशराम शिंदे, सुभाष आहिरे यांनी केले आहे.</p>