
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
कांद्याला ३०० रुपये अनुदान (subsidy) जाहीर करून राज्य सरकारने (State Govt) शेतकऱ्यांची चेष्टा केली असून
शेतकरी (farmers) बांधवाना प्रति क्विंटल सुमारे दीड हजार रुपये इतका उत्पादन खर्च येत असतांना सरकारने किमान १ हजार रुपये अनुदान देऊन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पगार (NCP District President Adv. Ravindra Pagar) यांनी केली. कांदा (onion) अत्यंत कवडीमोल भावाने विकला जात आहे. कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने
नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (Nashik District Nationalist Congress Party) वतीने चांदवड (chandwad) येथे रास्ता रोको आंदोलन (agitation) करून कांद्याला २५०० रुपये हमीभाव जाहीर करण्याची मागणी केली होती. मुंबई–आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ वरील चांदवड येथील आंदोलनाची दखल घेऊन राज्य सरकारला कांद्याला ३०० रुपये अनुदान जाहीर करावे लागले आहे. परंतु इतके तुटपुंजे अनुदान जाहीर करून राज्य सरकारने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.
त्यामुळे शेती व शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था मोडकळीस येणार आहे. म्हणून राज्य सरकारने तातडीने कांद्याला १ हजार रुपये इतके अनुदान द्यावे अशी मागणी देखील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष ऍड. रविंद्र पगार यांनी प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात केली आहे.