<p><strong>नाशिक । Nashik</strong></p><p> नाशिक येथे 25 मार्च ते 28 मार्च दरम्यान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. यासाठी राज्यभरातून साहित्यप्रेमी येणार असून याचा फायदा घेत ओबीसींसाठी सुरू करण्यात आलेल्या महाज्योती योजनेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी होऊ शकतो. </p> .<p>यामुळे संमेलनापुर्वी नाशिक येथील उपमुख्य कार्यालय सुरू करावे असे साकडे समता परिषदेच्या वतीने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना घालण्यात आले आहे.</p><p>याबाबत भुजबळ यांची भेट घेऊन समता परिषदेचे कार्याध्यक्ष समाधान जेजुरकर व पदाधिकार्यांनी निवेदन दिले आहे. यात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारकडून ओबीसी भटक्या जाती , विमुक्त जमाती व विशेष मागास प्रवर्ग यासाठी महात्मा ज्योतीबा फुले संशोधन व प्रशिक्षण (महाज्योती) ही संस्था निर्माण झाली आहे, शासनानी महाज्योतीसह विविध योजना ओबीसी प्रवर्गासाठी सुरु केल्या आहेत. </p><p>वर्तमानपत्रात याबाबत जाहीराती प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप अपेक्षीत व लक्ष्यांक इतका प्रतिसाद मिळालेला नाही. 7 जानेवारीच्या महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये नाशिक येथे महाज्योतीचे उप मुख्यकार्यालय, स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार नाशिकमध्ये हे कार्यालय तात्काळ सुरू करण्याची आवश्यकता आहे.</p><p>नाशिक येथे 24 मार्च ते 26 मार्च या कालावधीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्रातील लक्षावधी साहित्यप्रेमी नागरीक येणार आहेत . महाज्योतीच्या प्रचार व प्रसारासाठी ही योग्य संधी आहे. </p><p>त्यामुळे या मराठी साहित्य संमेलनात महाज्योतीचे प्रचार स्टॉल लावुन, तसेच परिसरात जाहीरात व माहितीपर फ्लेक्स लावुन, महाज्योतीच्या योजनांचा प्रसार करणे व ती सर्वांपर्यंत पोहचवणे शक्य होणार आहे. परंतु तत्पुर्वी नाशिक येथे प्राथमिक स्वरुपात महाज्योतीचे उपमुख्यालय सुरु करण्याची आवश्यकता आहे. </p><p>येथील सामाजिक न्याय विभागामध्ये महाज्योती कार्यालयासाठी जागा उपलब्ध आहे, परंतु त्यासाठी अजुनही कार्यवाही सुरु झालेली नाही. यामुळे यासाठी तातडीने पावले उचलण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती करण्यात आली आहे.</p>.<p><strong>योजनेच्या प्रचाराची संधी </strong></p><p>शासनाने महाज्योती योजनेद्वारे ओबीसी विद्यार्थी व सर्व घटकांसाठी महत्वाच्या तरतुदी केल्या आहेत. यामध्ये स्पर्धा परिक्षांसाठी मोफत निवासी प्रशिक्षण, विमान पायलट प्रशिक्षणासाठी मदत, विविध शिष्यवृत्ती योजना, ग्रंथालये, उद्योग व व्यावसायिक प्रशिक्षण यासाठी मोठी तरतुद केली आहे. </p><p>मात्र याबाबत ओबीसी समाजातील बहूतांश नागरीकांना या योजनेची पुरेसी माहिती नाही. नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात या योजनेच्या प्रचार व प्रसाराची संधी असून येथे राज्यभरातून येणारे साहित्य प्रेमी आपआपल्या भागात या योजनेचा प्रसार करतील यामुळे महाज्योतीचा स्टॉल लाऊन या संधीचा फायदा घेता येईल. </p><p><em>- समाधान जेजुरकर, कार्याध्यक्ष समता परिषद</em></p>