प्लास्टिक कारखाने शहराबाहेर हलवा

शासनस्तरावर मूलभूत सोयीसुविधांसाठी पाठपुरावा करणार : कृषी मंत्री भुसे
प्लास्टिक कारखाने शहराबाहेर हलवा

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

प्रदूषण नियंत्रित ठेवून निसर्गाचा समतोल राखणे ही सर्वांची सामुहिक जबाबदारी असल्याचे स्पष्ट करत कृषिमंत्री दादा भुसे ( Agriculture Minister Dada Bhuse ) यांनी शहरातील प्लास्टिक कारखाने ( Plastic Industries ) कारखानदारांनी एकत्र येऊन शहराबाहेर मोकळ्या स्थलांतरीत करणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.

प्लास्टिक कारखाने शहराबाहेर हलवावे यासाठी शासनस्तरावर मदत केली जाईल. तसेच त्या ठिकाणी आवश्यक सर्व मुलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही येथे बोलतांना दिली.

येथील शासकीय विश्रामगृहात प्लास्टिक कारखाना चालक व मालक यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषीमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी नगरसेवक एजाज बेग यांच्यासह प्लॅस्टिक कारखानदार अल्ताफ बेग, जमिल भाई, रफिक भाई, युनूस मुल्ला, शफीउल्ला भाई, मन्सूर आलम सिराज आलम, शफील भाई, जमिल हसन, जिया शेख अल्लाउद्दीन, डॉ हलीम, असिफ भाई, फतेह अली, निहाल चक्कीवाले, शब्बीर भाई, मुसा भाई आदी उपस्थित होते.

प्रदूषण नियंत्रित ठेवून निसर्गाचा समतोल राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे सांगताना भुसे म्हणाले, प्लास्टिक कारखाने हे शहराच्या बाहेर मोकळ्या ठिकाणी स्थलांतरित करणे गरजेचे आहे.

यासाठी शासनाकडून आवश्यक ती मदत केली जाईल व कारखानदारांसाठी आवश्यक असलेल्या सर्व मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी शासन स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. असे आश्वासनही ना. भुसे यांनी उपस्थितांना दिले.

नगरसेवक एजाज बेग यांच्या नेतृत्वाखाली प्लॅस्टिक कारखाना चालकांनी कृषिमंत्री भुसेंची भेट घेत आपल्या समस्या व प्रश्न मांडले. प्लॅस्टिक कारखाने शहराबाहेर स्थलांतरित करण्याबाबतचे ना-हरकत प्रमाणपत्र मिळणे त्याच बरोबर प्लॅस्टिक उद्योग ऐवजी इतर दुसर्‍या उद्योगांसाठी महापालिकेकडून परवानगी मिळणे, शहरी हद्दीतून कारखाने स्थलांतरित करण्यासाठी शासनाकडून मुदतवाढ मिळावी. वीज वितरण कंपनीकडून करण्यात आलेली वाढीव वीज देयकांमध्ये सवलतीच्या दराने आकारणी करण्यात यावी आदी विविध समस्यांकडे यावेळी भुसे यांचे लक्ष वेधण्यात आले.

प्लास्टिक कचर्‍यावर प्रक्रिया करून पर्यावरणाच्या रक्षणाबरोबर निसर्गाचा समतोल राखत कारखानदार एकप्रकारे देशसेवाच करत आहेत. राज्य व केंद्र शासनाच्या ज्या काही सवलती, सोयीसुविधा व आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील असे आश्वासन देत भुसे यांनी कारखानदारांना चाळीसगाव फाटा, सायने व अजंग-रावळगाव एमआयडीसीमध्ये प्लॅस्टिक उद्योगासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्याने त्या ठिकाणीदेखील उद्योग सुरू होऊ शकतात.

शहरातील प्लॅस्टिक कारखाने स्थलांतरित करणे, प्लॅस्टिक उद्योगऐवजी इतर उद्योग सुरू करण्याबाबतची परवानगी मिळणे व कारखाने स्थलांतरित करण्यासाठी मुदतवाढ मिळण्याबाबतचे प्रश्न लवकरच निकाली काढून यावर सकारात्मक तोडगा काढण्यासाठी प्रयत्नशील राहू असे, आश्वासन त्यांनी कारखानदारांना दिले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com