नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :
प्रभाग क्र. २७ मध्ये सिंहस्थ नगर येथे अंतर्गत रस्त्याचे काम पूर्ण झाली आहेत मात्र स्वामी समर्थ केंद्र लगत असलेल्या अंतर्गत रस्त्याचे काम न झाल्यामुळे लोकप्रतिनिधींबद्दल नागरिकांच्या मनात रोष व्यक्त केला जात आहे.
येथील स्वामी समर्थ केंद्र शेजारील गल्लीतील रस्ता पूर्णपणे उखडला गेला आहे. या ठिकाणी पाणी साचून दुर्गंधीचे वातावरण तयार झाले आहे. लोकप्रतिनिधींनी प्रभागात इतरत्र ठिकाणी रस्त्यांचे कामे केले. मात्र सदर रस्त्यालगत असलेले पेव्हर ब्लॉक देखील उखडून टाकल्याने असा प्रकार का केला गेला ? असा सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
विकास कामे करीत असतांना लोकप्रतिनिधींनी राजकारण बाजूला ठेवून सर्वांना समान वागणूक दिली पाहिजे असे मत परिसरातील जेष्ठ नागरिकांनी व्यक्त केले आहे.