<p><strong>इगतपुरी । Igatpuri </strong></p><p>“माझी वसुंधरा अभियान ” मोहिमे अंतर्गत इगतपुरी शहरात सायकल रॅलीचे आयोजन मुख्याधिकारी निर्मला गायकवाड-पेखळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. </p> .<p>या सायकल रॅलीत सहभागी होण्यासाठी शहरातील प्रतिष्ठित नागरिक, नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी, शहरातील युवा वर्ग, तसेच सायकल पटु यांनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवुन खुप चांगला प्रतिसाद दिला. रॅलीची सुरुवात सकाळी तानाजी टी स्टॉल, खालची पेठ येथून निघून राममंदिर ते शहरातून फिरून नगर परिषदेजवळ समारोप झाला.</p><p>शहरातील वायू प्रदूषण कमी करण्यासाठी नॉनमोटराईजड वाहतुकीस प्रोत्साहन देण्यासाठी इगतपुरी नगरपरिषद व जनसेवा प्रतिष्ठान यांचे संयुक्त विद्यमाने हि रॅली काढण्यात आली. नगरपरिषद येथे रॅलीच्या समारोप प्रसंगी जनसेवा प्रतिष्ठानचे किरण फलटणकर, सुनिल आहेर, प्रदिप रजपुत, अविनाश कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करुन नागरिकांची पर्यावरण विषयक आपली जबाबदारी बाबत जाणीव करुन दिली. तसेच आपले आरोग्य कसे चांगले राहिल याबाबत डॉ. प्रदिप बागल यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.</p><p>शहरात महिन्याच्या प्रत्येक १५ तारखेला सायकल रॅली घेतली जाणार असून पुढील काळात अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याने नागरिकांनी यात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.</p>