कांदा भिजल्याने टाकला शेळ्यांपुढे; बळीराजाचे कष्ट झाले मातीमोल

कांदा भिजल्याने टाकला शेळ्यांपुढे; बळीराजाचे कष्ट झाले मातीमोल

येवला | प्रतिनिधी | Yeola

महाराष्ट्रात सर्वदूर अवकाळी पावसाने (rain) सर्वसामान्यांना जेरीस आणले आहे. यामुळे बळीराजा गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संकटात सापडला आहे.

चार-चार महिने कष्ट करून, हातातोंडाशी आलेला घास या अवकाळीने हिरावून नेला आहे. त्यामुळे शेतकरी पुरता त्रस्त आणि चिंताग्रस्त झाला आहे.

कांदा भिजल्याने टाकला शेळ्यांपुढे; बळीराजाचे कष्ट झाले मातीमोल
आनंदाची बातमी!, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मिळणार 71 हजार तरुणांना नियुक्तीपत्रं

या अवकाळीचा फटका नाशिक जिल्ह्यालाही (Nashik District) मोठ्या प्रमाणात बसला आहे. येवला तालुक्यातील पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार धडक दिली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

यामुळे शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने पिकवलेले पिक हातून सोडून द्यावे लागत आहे. अंदरसुल गावातील कांदा (Onion) उत्पादक शेतकरी गोरख सोनवणे यांनी आपला कांदा भिजला असल्याने त्याला आता काहीच भाव मिळणार नाही, बाजार समितीत घेऊन जाणेही परवडणारे नसल्याने शेळ्यांपुढे सोडून दिला आहे. अशी वाईट वेळ या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com