<p><strong>नाशिक । प्रतिनिधी</strong></p><p>मागील दोन दिवस मालेगाव,सटाणा आणि नांदगाव तालुक्यातील ५१ गावांना गारपीटीने झोडपले. ८ हजार २७९ हेक्टर क्षेत्रावरील भाजीपाला,कडधांन्य व फळपिकांचे नुकसान झाले. जिल्ह्यात मागील १० दिवसात जवळपास १३ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावरील पिके अवकाळीने आडवी झाली आहेत...</p>.<p>राज्यासह जिल्ह्याला अवकाळी पाउस व गारपिटिचा तडाखा बसला आहे.जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस व गारपीटीने ५ हजार ७०२ हेक्टर क्षेत्रावरील रब्बी हंगामातील गहू, मका पिकांसह उन्हाळी कांदा आदी पिकांना जोरदार तडाखा दिला. </p><p>या नुकसानीचे पंचनामे सुरु असतांना सलग दोन दिवसांपासून मालेगाव,सटाणा आणि नांदगाव तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीने जिल्हयातील रब्बी हंगामातील गहू, मका, बाजरी, हरभरा, भुईमुग व ऊस पिकांसह बहु-वार्षिक फळपिकांचे मोठे नुकसान झाले आहे.</p><p>उन्हाळी काद्यांचे मोठी हानी झाली आहे.जिल्हयातील तब्बल ५ हजार ९५२ हेक्टर क्षेत्रावरील कांद्याला अवकाळीचा तडाखा बसला आहे. एकूण ५१ गावातील ११ हजार ९५३ शेतकर्यांच्या ८ हजार २७९ हेक्टरवरील पिकांना अवकाळीचा फटका बसला आहे.</p><p>तर, वीज पडून चांदवड तालुक्यातील कानमंडाळे येथील पंढरीनाथ मुरलीधर मोरे यांची गाय मयत झाली आहे. गेल्या सप्ताहात शनिवारी व रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीटीच्या नुकसानीनंतर झालेल्या या नुकसानीने शेतकर्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान प्रशासनाकडून नूकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरु अाहे.</p>