नाशिक । प्रतिनिधी Nashik
जूनच्या प्रारंभी आलेल्या निसर्ग चक्री वादळाने जिल्ह्यात धुमाकुळ घालत पीकांचे व पशुधनाचे मोठे नूकसान केले होते.
त्यास तीन महिने लोटले तरी पशूधन वगळता घरपडझड व पीक नुकसानीची मदत मिळणे बाकी आहे.नूकसान भरपाईसाठी ३ कोटींची मागणी जिल्हाप्रशासनाने केली होती. त्यापैकी पशुधन नुकसानिचे ११ लाखांची मदत शासनाकडून प्राप्त झाली आहे. उर्वरीत घर पडझड व पीक नूकसान भरपाई याची अद्याप प्रतीक्षा आहे.
मागील ३ जूनला कोकण व नंतर मुंबईमार्गे निसर्ग चक्रीवादळ नाशिकला स्पर्शून पुढे गेले होते. या वादळाने जिल्ह्याला मोठा तडाखा दिला होता. ५३० हेक्टरवरील पिके आडवि झाली होती.जोरदार वारा व मुसळधार पाऊस यामुळे घरांची मोठया प्रमाणात पडझड झाली. ४७५ कच्च्या घरांना वादळाचा फटका घरांचे छत व पत्रे उडणे, भिंत खचणे अशा स्वरुपाचे नूकसान झाले.
त्यामुळे अनेकजण उघडयावर आले. लाॅकडाऊन काळात पशूधन हे शेतकर्यांसाठी उदरनिर्वाहचे मोठे साधन होते. मात्र निसर्ग चक्रिवादळाने पशुधनाचे मोठे नूकसान झाले होते. ४५ मोठि तर २८ छोटी जनावरे वीज पडून व अन्य कारणांनी दगावली होती. पालकमंत्री भुजबळ यांच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाने युध्दपातळिवर पंचनामे पूर्ण करत मदतीसाठी शासनाकडे अहवाल पाठवला होता. त्यापैकी पशुधन नुकसानिची मदत भरपाईचे ११ लाख रुपये जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली आहे.
लहान जनावरे कोंबडी, शेळी, मेंढया व बोकड यांच्यासाठी ३ हजार रुपये नूकसान भरपाई देण्यात आली. तर बैल, गाय, म्हैस, गाढव, खेचर या मोठया जनावरांसाठी ७ ते ८ हजार रुपये मदत दिली गेली. दरम्यान, पीक नूकसान व घरांची पडझडिची नूकसान भरपाई प्राप्त होणे अद्याप बाकी आहे. जिल्हा प्रशासनाने निसर्ग चक्रीवादळ नुकसान भरपाईसाठी शासनाकडे ३ कोटी रुपयांची मदत मागितली होती.
मात्र करोना संकटामुळे उद्योगधंदे व व्यवसाय ठप्प असून उत्पन्नाअभावी तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे शासनाकडून मदत प्राप्त होण्यास विलंब होत आहे. पशूधनची नूकसान भरपाई मिळाल्याने शेतकर्यांना थोडीफार दिलासा मिळाला असला तरी पीक व फळबागाचे नूकसान, घर पडझडीची मदत मिळणे बाकी आहे.