<p>नाशिक । प्रतिनिधी</p><p>अखिल भारतीय ९४ वे मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत असून त्यासाठी पोलिस आयुक्तलयाने गठित केलेल्या समितीत 'दैनिक देशदुत'च्या कार्यकारी संपादक डाॅ. वैशाली बालाजीवाले व विश्वास बॅकेचे संचालक विश्वास ठाकूर यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.</p> .<p>नाशिक येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात २७ ते २९ मार्च या कालावधीत ९४वे अखील भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे.</p><p>संमेलनाच्या आयोजनाची जय्यत तयारी सुरु असून जिल्हा प्रशासनापासून पोलिस यंत्रणेपर्यंत सर्व तयारीला लागले आहे.</p> .<p>साहित्य संमेलन निर्विघ्नपणे व शांततेत पार पडावे यासाठी नाशिक पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी सल्लागार समिती गठित केली आहे.</p><p>संमेलनात होणारे विविध कार्यक्रम,मिरवणूक आदिस परवानगी देणे, संमेलन सुरळीत पार पडावे यासाठी उपाय योजना करणे, वाहतूक व पार्किंग व्यवस्था आदी विषयांवर ही समिती विचार करणार आहे.</p><p>या समितीवर महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय, सार्वजनिक बांधकाम, विद्युतपुरवठा, प्रादेशिक परिवहन, अन्न व औषधे प्रशासन यांचे प्रतिनिधी आहेत. लोकहितवादी मंडळाचे प्रतिनिधी म्हणून विश्वास ठाकूर आणि 'देशदूत'च्या संपादक डॉ.वैशाली बालाजीवाले यांचा समितीत समावेश करण्यात आला असून हे या समितीवर सदस्य म्हणून काम करणार आहेत.</p>