दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वाहनधारकांची तारांबळ

दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे वाहनधारकांची तारांबळ

नाशिक | प्रतिनिधी Nashik

वाघाडी परिसरातून ( Waghadi Area) अचानक गोदापात्रात पाणी मोठ्या प्रमाणात आल्याने काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली.

या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे (smelly water) परिसरातील नागरिकांची गैरसोय झाली यामध्ये अनेक वाहने पाण्यात अडकली होती.

गोदावरीच्या नदीपात्रात गेल्या काही दिवसांपासून गटारीचे पाणी मिसळत असल्याचे समोर येत आहे. गाडगे महाराज पुलाखाली आज (दि ७)वाघाडी मधून हे पाणी जास्तच प्रमाणात मिसळल्याचे बघावयास मिळाले; परिणामी काही काळ वाहतुकीचा खोळंबा झाल्याचे चित्र आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com