दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीपात्र कोरडेठाक

परिसरातील गावांना पाणी टंचाई
दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीपात्र कोरडेठाक

ओझे | Oze

दिंडोरी तालुक्यातील कादवा नदी पात्र कोरडे पडले असून नदी पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. त्यांमुळे ओझे, करंजवण, लखमापूर, म्हैळूस्के येथील गावांना पाणी टंचाई निर्माण झाली असून करंजवण धरणातून कादवा नदीत पिण्यासाठी पाणी सोडण्याची मागणी कादवा नदी परिसरातील गावामधून होत आहे.

गेल्या एक महिन्यापुर्वी कादवा नदीत सोडलेले पाणी बंद करण्यात आले व नंतर आठ दिवसातच कादवा नदीचे पात्र कोरडे पडले आहे. त्यामुळे परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासह जनावराच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच काही ठिकाणी कादवा नदी पत्रात लगत गावाला पाणीपुरवठा पाणी योजना आहे.

त्यांनाही मोठ्या प्रमाणात पाणी कमी पडले आहे त्यांच प्रमाणे सध्या कादवा नदी परिसरामधील गावामध्ये करोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शासनाच्या गाईडलाईन नुसार वारंवार हात पाय धुण्यासाठी जास्त पाण्याचा वापर होत आहे त्यामुळे कादवा नदी पात्रात मागणी सोडण्याची आवश्यकता आहे.

विशेष म्हणजे गेल्या एक महिन्यापासून करंजवण , ओझे, म्हैळूस्के ,लखमापूर परिसरामध्ये मृत्यूचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे त्यांमुळे अंत्यसंस्कारसह दशक्रियाला पिंडदानाही पाणी शिल्लक नाही.

त्यांमुळे उशाला धरण पायथ्याला नदी तरी गावे पाण्यावाचून उपाशी अशी म्हण्याची वेळ आली तरी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी कोरड्या पडलेल्या कादवा नदी पात्रात पाणी सोडून तालुक्यातील न्याय द्यावा अशी मागणी कादवा परिसरातून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com