नाशिक । प्रतिनिधी
मराठा अारक्षण टिकविण्यासाठी महाविकास आघाडी गंभीर अाहे. मागच्या सरकारने दिलेले वकिल व आम्ही दिलेले नवीन वकिल एकत्रितपणे न्यायालयात मराठा आरक्षणाची लढाई लढत आहे.
मराठा आरक्षणाबाबत राजकिय स्वार्थासाठी कोणी कोल्हेकुई करु नये असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नाव न घेता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटिल यांना लगावला.
नाशिक येथे जलसंपदा विभागाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.२२) जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला असता बैठकीनंतर त्यांनि पत्रकारांशी संवाद साधला. वळण बंधारे कामांना गती देऊन पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्यातील जास्ती जास्त वाहून जाणारे पाणी अडविले जाईल.
वळणयोजनेद्वारे गुजरातला वाहून जाणारे पाणी अडविण्यात येइल.अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान संदर्भात लवकरचं चर्चा करु. कामगार व मजूर यांच्या नोकरिवर गंडांतर येऊ नये अशी सरकारची भूमिका आहे.
टाळेबंदी मुळे काही प्रश्न गंभीर होतात. त्यामुळे यापुढे टाळेबंदी नाहि. नागरिकांनीच पुढाकार घेवून करोनाला अटकाव केला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.