त्र्यंबकेश्वर । प्रतिनिधी
नाशिक जिल्ह्यात करोनाचा वाढता विळखा लक्षात घेता त्र्यंबकेश्वरला २९ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत जनता कर्फ्यूची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी दिली.
दरम्यान प्रांताधिकारी तेजस चव्हाण, तहसीलदार पोलीस अधिकारी तसेच तहसीलदार व व्यापारी बैठकीला उपस्थित होते व्यापारी असोसिएशन अध्यक्ष मांगीलाल शेठ सारडा यांनी विधायक सूचना केल्या
करोना संकट काळ अनिष्ट परिणाम दिसू लागल्याने जनता कर्फ्यू निर्णय घेतला घेतला आहे असे पालिकेकडून स्पष्ट करण्यात आले
मेडिकल व दूध विक्री वगळता इतर सुविधा बंद राहतील असे नियोजन यात आहे.