ऑक्सिजन प्लान्टमुळे नक्कीच फायदा

कळवण येथील कार्यक्रमात मंत्री जयंत पाटील यांचे प्रतिपादन
ऑक्सिजन प्लान्टमुळे नक्कीच फायदा

कळवण | Kalvan

करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये (Corona Second Wave) प्राणवायूच्या कमतरतेमुळे अनेक अडचणी उद्भवल्या होत्या. मात्र, आता शासनाच्या प्रयत्नाने संपूर्ण राज्य प्राणवायूच्या (Oxygen) बाबतीत स्वयंपूर्ण होत आहे....

जिल्ह्यातील महत्वाच्या शासकीय रुग्णालयांमध्ये (Government Hospitals) स्वयंनिर्मित प्राणवायू (oxygen) तयार करण्याचे आधुनिक तंत्रज्ञान आणि रुग्णालयात पोहचविण्यासाठी असलेली मध्यवर्ती यंत्रणा यामुळे नक्कीच फायदा होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी केले आहे.

कळवण उपजिल्हा रुग्णालय येथील प्राणवायू निर्मिती प्रकल्पाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार नितीन पवार, जिल्हा परिषद सदस्य यतींद्र पगार, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, वैद्यकीय अधीक्षक डॉ अनंत पवार, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत खैरे यांचेसह कळवण उपजिल्हा रुग्णालयातील विशेषज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, करोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत सुरुवातीला जम्बो सिलिंडरची समस्या होती तर कधी कधी कंपन्यांना द्रवरूप प्राणवायू उपलब्धतेच्या तुटवड्याच्या समस्येने उग्र रूप धारण केले होते.

यावर उपाय म्हणून द्रवरूप प्राणवायू न वापरता हवेतील प्राणवायूचा पी.एस.ए. तंत्रज्ञानाच्या साह्याने उपयोग करुन निर्मिती करणे शक्य झाले आहे. कळवण उपजिल्हा रुग्णालयामार्फत २० हजार नागरिकांचे लसीकरण झाल्याबद्दल अभिनंदन देखील त्यांनी यावेळी केले.

यावेळी बोलताना आमदार नितीन पवार (MLA Nitin Pawar) म्हणाले की, कळवण (Kalvan) आणि अभोना रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट (Oxygen plant) कार्यान्वित झाल्याने तालुक्यात ऑक्सिजनची कमतरता पडणार नाही.

आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर देण्यात येत आहे. तालुका आरोग्याच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जास्तीत जास्त आरोग्य सुविधा उभारण्यावर भर देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी करोनाची संभाव्य तिसरी (Corona Third Wave) लाट लक्षात घेता राज्य सरकारने शासकीय रुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प मंजूर केले असून काही ठिकाणी जिल्हा विकास निधीतून तर काही ठिकाणी सी एस आर फंडातून यांची निर्मिती करण्यात आली आहे.

आज कळवण येथे हा प्रकल्प कार्यान्वित होत आहे. यापूर्वी जिल्ह्यात गिरणारे येथे पहिला तर त्यानंतर आजपर्यंत येवला आणि चांदवड उपजिल्हारुग्णालयात प्राणवायू निर्मिती प्रकल्प (Oxygen Generation Project) कार्यान्वित झाले असून आदिवासी भागातील हा पहिलाच प्रकल्प आहे.

आदिवासी भागातील दळणवळणाच्या गैरसोयी, प्राणवायू पुनर्भरण प्रकल्पाचे साधारणतः १५० किलोमीटर अंतराचा फेरा यामुळे वाचणार आहे. या प्रकल्पात दाखल रुग्णांना पाईपलाईनद्वारे प्राणवायू पुरवणे तसेच जम्बो सिलेंडर भरण्याची क्षमता आहे.

यामुळे प्रकल्पामुळे उपजिल्हारुग्णालय व आवश्यकता भासल्यास शहरातील इतर रुग्णालयांची सोय होणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली.

वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार यांनी प्राणवायू प्रकल्प कार्यान्वित झाल्याने 110 जम्बो सिलिंडर्स प्रतिदिन निर्मिती होणार आहे. उपजिल्हा रुग्णालय कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी सज्ज झाले आहे. तसेच पी एस ए तंत्रावर आधारित प्राणवायू प्रकल्पाच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com