<p><strong>नाशिकरोड | दर्शन मिस्तरी</strong></p><p>लोकांच्या निष्काळजीपणामुळे राज्यात गेल्या आठवड्यापासून कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन होण्याची नामुष्की ओढवली आहे....</p>.<p>कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन होते की काय, असा प्रश्न परप्रांतीय कामगार तसेच रहिवाशांना सतावत आहे. यामुळे नाशिकरोड रेल्वेस्थानकावर गाड्यांच्या चौकशीसाठी गर्दी वाढत असून, आरक्षणासाठी रांगा लागल्या आहेत.</p><p>नाशिकरोडच्या रेल्वेस्थानकावरील वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा गेल्या पंधरा दिवसांपासून करार संपलेला असल्याने रेल्वेस्थानकावर कोरोनाच्या चाचण्या बंद आहेत. यामुळे रेल्वेस्थानकावर लोकांच्या वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.</p><p>तसेच परराज्यांतून येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची तापमान तपासणी व संशयित रुग्णांच्या तपासण्या होत नाही आहेत. यामुळे नाशिक शहरात देखील कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे.</p><p>नाशिक शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देवून या परिस्थितीतून लवकरात लवकर मार्ग काढायला हवा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.</p>