<p>नाशिक | प्रतिनिधी </p><p>देशातील प्रत्येक नागरिकाला घटनेने आपले अधिकार आणि कर्तव्य दिले आहेत. राज्यपाल नियुक्त सदस्यांची निवड करणे राज्यपालांचे कर्तव्य आहे. त्यामुळे ते बजावतील अशी अशा व्यक्त करत नाशिकचे पालकमंत्री आणि नागरी व अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली...</p>.<p>ते म्हणाले, राज्यपालांच्या आदेशाने महत्वाचे निर्णय होतात. मंत्रिमंडळाच्या पाठीमागे उभं राहणं हे राज्यपालांचं काम आहे. मंत्रिमंडळाने देखील राज्यपालांचा योग्य तो मान सन्मान ठेवला पाहिजे.</p><p>अनेकदा राज्य सरकार वेगळं, केंद्रात सरकार वेगळं असताना राज्यपालांनी नियमांचं पालन केलेलं आहे. महाराष्ट्रातील राजभवन आणि CMO यांच्यात अंतर वाढले आहे.</p><p>परंतु राज्यपालांचं कर्तव्य आहे की त्यांनी आमदारांची नियुक्ती करावी. चार महिने झाले असतानाही राज्यपालांनी अद्याप निर्णय न घेणे कितपत योग आहे असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.</p>