
निफाड | रावसाहेब उगले | Niphad
एकीकडे शासन (Government) गरीबांना रेशनच्या (Ration) माध्यमातून मोफत धान्य देण्याच्या धोरणाची अंमलबजावणी करीत असताना दुसरीकडे कर भरला नाही म्हणून रेशनचे धान्य न देण्याचा अजब ठराव निफाड तालुक्यातील (Niphad Taluka) गोरठाण ग्रामपंचायतीने (Gorthan Gram Panchayat) केला आहे. यामुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे...
प्रेमविवाहासाठी आई - वडिलांची संमती असल्याचा पुरावा असल्याशिवाय विवाह नोंदणी न करण्याचा ठराव निफाड तालुक्यातील सायखेडा ग्रामपंचायतीने (Saikheda Gram Panchayat) केला होता. त्यानंतर समाज माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. मात्र, आपण अशा प्रकारचा कायदा शासनाने करावा, असा ठराव केल्याचे घुमजाव ग्रामपंचायतीने केला होता. या प्रकारावर पडदा पडत नाही तोच गोरठाण ग्रामपंचायतीने कर (Tax) न भरणाऱ्या लाभार्थ्यांना रेशनचे धान्य न देण्याचा ठराव केला आहे.
दरम्यान, याबाबत तलाठी घोटे यांंच्याशी संपर्क साधला असता त्यांनी "असा ठराव कुठल्याही नियमात बसत नाही" असे सांगितले. कर वसुलीतून गावचा विकास करणे ठिक आहे. मात्र, कर भरला नाही म्हणून रेशनचे धान्य न देण्याचा केलेला ठराव करणारी गोरठाण ग्रामपंचायत बहुदा राज्यातील पहिलीच असावी.