वर्ष होऊनही रखडलेल्या कामांना ठेकेदारांना मिळेना मुहूर्त !

वर्ष होऊनही रखडलेल्या कामांना ठेकेदारांना मिळेना मुहूर्त !

गणेशगाव (वा) विनायकनगर येथील परिस्थिती

वेळूंजे । Velunje

गेल्या वर्षांपासून गणेशगाव(वा) येथील ग्रामपंचायत कार्य क्षेत्रात असलेल्या विनायक नगर येथील सांडपाणी गटारीचे अद्यापही रखडलेलेच दिसून येत आहे.

दरम्यान गणेशगाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत येत असलेल्या विनायकनगर येथे वर्षभरापासून सांडपाणी गटार योजनेचे काम मंजूर असून अद्यापही कामाला सुरवात झालेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचे काम सुरु कधी होणार याकडे लक्ष लागले आहे.

एकूणच या कामाचा ठेकेदाराचे कामाकडे दुर्लक्ष असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक गावांना अशीच परिस्थिती असल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायत याकडे लक्ष देत नसल्याचा आरोपही ग्रामस्थ करतात.

विनायकनगर येथे यापूर्वी समाज मंदिराचे काम पार पडले आहे. तर या कामाचा अनुभव सांगताना गावकरी म्हणतात कि, त्यावेळी ठेकेदाराने फक्त कॉलम उभे केले अन काम सोडून निघून गेला. शेवटी ते काम गावं वर्गणी जमा करून पूर्ण केले.

अशी परिस्थिती असल्याने ग्रामीण भागातील ग्रामपंचायत कामे अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होणे गरजेचे असल्याचे येथील जेष्ठ नागरीक सांगतात.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com