नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :
नाशिक शहर पोलीस आयुक्तलयातील पोलीस करोना काळात कर्तव्य बजावताना मृत्युमुखी पडलेल्या सेवकांच्या वारसांना अनुकंपावर त्वरीत सामावून घ्यावे अशा आशयाचे निवेदन नाशिककरांच्या वतीने पोलीस आयुक्तांना देण्यात आले.
करोना योध्या मयत सुनील शिंदे, अरुण टोंगारे, विजय शिंपी यांचेसह दहा पेक्षा जास्त पोलीस मयत आहेत. त्यांचा वारसांना त्वरित अनुकंपावर ठाणे जिल्हा पोलीस आयुक्त करोना योध्या मयतांच्या वारसांना सामावून घेतले आहे.
त्याप्रमाणे सामावून घ्या अशी मागणी नाशिककरांच्या वतीने पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्याकडे निवेदन द्वारे केली.
या प्रसंगी पोलीस आयुक्त पांडे यांनी लवकरच प्रस्ताव पाठवून लक्ष देणार असल्याचे आश्वासन दिले आहे. या प्रसंगी उपायुक्त पौर्णिमा चौगुले, उपस्थित होत्या. नाशिककरांच्या वतीने ऍड तानाजी जायभावे, राजू देसले, विजय दराडे यांनी आयुक्तांना निवेदन दिले.