ओझे | Oze
कांदा बियाणांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांनी डोंगळा लागवडीवर अधिक भर दिला आहे. यामुळे शेतकरी स्वतःच बियाणांचे उत्पादन घेत आहे.
दिंडोरी तालुक्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने शेतकऱ्यांनी टाळलेल्या कांद्याच्या रोपाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परिणामी रोपांचे नुकसान झाल्याने दोन तीनदा बियाणांची लागवड करावी लागली.
यातच बाजारातील बियाणे संपल्याने बियाण्याची टंचाई निर्माण होऊन दर वाढले. यामुळे कादां उत्पादक शेतक-यांनी जास्त डोंगळा लागवडीवर भर देवून स्वःताच्या शेतात बियाणे तयार करण्यावर भर दिल्यांचे चित्र सर्वत्र दिसत आहे.
बियाणे टंचाईवर मात करण्यासाठी यंत्राच्या साहाय्याने कांदा लागवड करणार असून यासाठी मजुरांचीही बचत होणार आहे.
- भाऊसाहेब ढाकणे, कांदा उत्पादक ओझे