<p><strong>दिंडोरी । प्रतिनिधी</strong></p><p>सध्या वीज कंपनीने शेतकर्यांना शेतीपंपाचे बिले दिले असून या बिलांची रक्कम मोठ्या प्रमाणात आल्याने शेतकर्यांना धक्का बसला आहे. वीजपंपाचा वापर व आलेले बिल यांच्यात तफावत असल्याने ही तफावत दूर करून शेतकर्यांना योग्य त्याच बिलांची आकारणी करावी, अशी मागणी माजी आमदार रामदास चारोस्कर यांनी केली आहे. </p>.<p>शेतीसाठी देण्यात आलेल्या वीजजोडणीनुसार बिले येणे अपेक्षित होते. परंतु महावितरण गलथानपणा उघड करून अनेक शेतकर्यांकडे 3 एचपी शेतीपंप असून, 3 एचपीनेच कोटेशन भरलेले असताना वीजबिल पाच एचपीचे बिल तर पाच एचपी शेती पंपावाल्यांना साडेसात एचपीची बिले येत आहे.</p><p>याबाबत दिंडोरी येथील शेतकर्यांनी रामदास चारोस्कर यांची भेट घेऊन आपले गार्हाणे मांडले. त्यानंतर चारोस्कर यांनी वीज कंपनीचे उपअभियंता राऊत व बोरकर यांच्याशी चर्चा केली.</p>