<p><strong>नाशिक । Nashik</strong></p><p>ई पाॅस मशिन बंद असल्यामुळे रेशनवरील धान्य वाटपाचे काम पूर्णपणे ठप्प झाले अाहे. त्यामुळे रेशनवर गुजारा करणार्या हजारो गरिब परिवारांवर उपासमारीची वेळ येउन ठेपली आहे. मशीन बंदच्या घोळामुळे जिल्ह्यातील २७०० पैकी १२०४ दुकानांमध्येच अन्नधान्य पोहचू शकले आहे.</p> . <p>ई पाॅस मशीनमध्ये बिघाड अथवा बंद हे नेहमीचे रडगाणे झाले असून १ मार्च पासून जिल्ह्यातील ई-पॉस मशीन्स सुरू झालेल्या नसल्याने धान्य वाटपाला ब्रेक लागला आहे. दरमहिन्याला एनआयसी कडून ई-पॉस मशीनचा डाटा घेतला जातो. त्यासाठी काहीवेळ मशीन्स बंद ठेवल्या जातात. </p><p>मात्र मागील दहा बारा दिवसांपासून मशीन्स बंद असल्यामुळे मार्च महिन्याच्या धान्यांचे वाटप अजूनही होऊ शकलेले नाही. ई-पॉस मशीन्सच्या साह्याने कार्डधारकांना नियमित धान्य पुरवठा केला जातो. या मशीन्सचा डाटा दरमहिन्याला एनआयसी एजन्सीकडून घेतला जातो. यासाठी ऑनलाईन पद्धतीने मशीन्सवरील डाटा घेणे आणि साठानिहाय अपलोड करण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. </p><p>या कामासाठी गेल्या एक तारखेला मशीन्स बंद ठेवण्यात आलेल्या आहेत. या मशीन्स अद्यापही सुरू होऊ शकलेल्या नाहीत. त्यामुळे रेशनवरील धान्य वितरण होऊ शकलेले नाही. जिल्हा पुरवठा विभागाने मार्च महिन्यासाठी असलेल्या धान्यांचा पुरवठा रेशनदुकानांना केेला आहे. मात्र यंत्रणा सुरू नसल्याने धान्यांचे वाटक होऊ शकलेले नाही. </p><p>जिल्ह्यात २७०० रेशनदुकानांच्या माध्यमातून धान्यपुरवठा केला जातो. आत्तापर्यंत १२०४ दुकानांमध्ये मार्च महिन्याचे धान्य पोहचलेले आहे. उर्वरित पुवठा येत्या २० तारखेपर्यंत पुर्ण केला जाणार आहे. जिल्ह्यात ६५,५९५ अंत्योदय, ८९,४१८ केशरी, ३,४३,५९० प्राधान्यक्रम कुटूब तर २२,३४६ इतके पांढरे रेशनकार्ड धारक आहे. </p><p>मार्च महिन्यांचे धान्य रेशनदुकानांमध्ये दाखल झालेले आहे. मात्र अजूनही त्यांचे वाटप होऊ शकलेले नाही. तर दुसरीकडे ई-पॉस यंत्रणा पुर्ववत कधी होणार याबाबत जिल्हा पुरवठा विभागाकडून मौन बाळगण्यात अाले आहे.</p>