6 कोटी 37 हजार 596 लाभार्थ्यांना 41 लाख 76 हजार 450 क्विंटल अन्नधान्य वाटप : मंत्री छगन भुजबळ

Minister Chhagan Bhujbal
Minister Chhagan Bhujbal6 कोटी 37 हजार 596 लाभार्थ्यांना 41 लाख 76 हजार 450 क्विंटल अन्नधान्य वाटप

मुंबई | Mumbai

राज्यातील 52 हजार 435 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे 1 जुलै ते 27 जुलैपर्यंत राज्यातील 6 कोटी 37 हजार 596 लाभार्थ्यांना 41 लाख 76 हजार 450 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. राज्यात या योजनेमधून सुमारे 18 लाख 73 हजार 379 क्विंटल गहू, 14 लाख 43 हजार 128 क्विंटल तांदूळ वाटप करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो (गहू + तांदूळ) मोफत देण्याची योजना आहे. या योजनेमधून दि. 15 जुलै पासून आतापर्यंत 8 लाख 59 हजार 944 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले आहे.

त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 3 लाख 30 हजार 49 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 6 जून पासून आतापर्यंत जून महिन्यासाठी 31 लाख 87 हजार 601 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी शिधापत्रिका असलेल्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे मे व जून महिन्यासाठी आतापर्यंत 13 लाख 4 हजार 46 क्विंटल वाटप केले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेत प्रति रेशनकार्ड 1 किलो मोफत डाळ (तूर किंवा चणा डाळ) देण्याची तरतूद आहे. आतापर्यंत या योजनेतून सुमारे 3 लाख 83 हजार 121 क्विंटल डाळीचे एप्रिल ते जून महिन्यासाठी वाटप केले आहे.

आत्मनिर्भर भारत या योजने अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट नसलेल्या विनाशिधापत्रिका धारकांना प्रति व्यक्ती 5 किलो मोफत तांदूळ दिला जात आहे सध्या मे व जून महिन्याचे वाटप सुरू आहे. आतापर्यंत या योजनेतून 1 लाख 33 हजार 709 क्विंटल मोफत तांदूळ वितरित केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com