जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik
परतीच्या पावसामुळे शेतकर्यांच्या शेतीचे 70 टक्के नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करून तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी.
तसेच विमा कंपनीशी टोल फ्री नंबरवर संवाद साधतांना शेतकर्यांना हिंदी व इंग्रजी या भाषेत निर्माण होणारी अडचण याबाबत विमा कंपनीशी संवाद साधून सक्तीने मराठी भाषेचा वापर करण्यात यावा, अशी मागणी मध्य नाशिकच्या आ. देवयानी फरांदे यांच्याकडे हरसूल भागातील शेतकर्यांनी केली आहे.
पावसाळ्यात मोठ्या आशेने शेतकर्यांनी भाताच्या लागवडी केल्या मात्र ऐन परिपक्व होवून सोंगणी योग्य होण्याच्या वेळीच भातावर मावा पडूंन रातोरात भाताचे क्षेत्र मावा रोगाने नष्ट केले आणि उरले सुरले पिक आता परतीच्या पावसाने झोडुन भुईसपाट केल्याने त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्वच मंडळ विभागातील गांवोगाव शेतकर्यांच्या हातून चालू वर्षी भात पिक निघुन चालले असून भाताच्या या गंभीर परिस्थिची पाहणी आ. फरांदे यांनी चिंचवड, चिरापल्ली, जातेगाव खुर्द या भागात केली.
यावेळी तालुका कृषी अधिकारी संजय पाटील, नायब तहसीलदार कांबळे, मंडळ अधिकारी वाघमारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत गायधनी, भाजप तालुकध्यक्ष विष्णू दोबाडे, योगेश तिडके, हर्षल भालेराव, बाळासाहेब अडसरे आदी उपस्थित होते.