<p><strong>घोटी । जाकीरशेख Ghoti</strong></p><p>इगतपुरी तालुक्यात गेल्या तीन दिवसात अवकाळी पावसामुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्यापासुन रोज खराब वातावरण व अवकाळी पाऊस पडत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात बागायती व रब्बी शेतपिकांचे तसेच जनावरांच्या चाऱ्यानंचे नुकसान झाले आहे. पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरीत पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी अशी मागणी माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. </p>.<p>इगतपुरी तालुक्यातील सध्या बागायती व रब्बी पिकांची शेतीची लागवड तसेच लागवडीपूर्व मशागतीची कामे सुरू आहे. टोमॅटो, काकडी, दोडके आदी फळभाज्यांचे उत्पादन सुरू असून बदलते वातावरण व अवकाळी पाऊस या पिकांना धोकादायक ठरत आहे. तसेच अवकाळी पावसाने जनावरांच्या चाऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.</p><p>गेल्या काही दिवसांपासून ऊन, पाऊस आणि थंडीचा खेळ सुरू असुन हिवाळा म्हटला तर रब्बीसाठी पोषक ठरला जातो. मात्र अवकाळी पाऊस ढगाळ वातावरण व पावसामुळे रब्बी पिकांची वाट लावली आहे. प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती व वातावरणातील बदल यामुळे शेतीपिकांना मोठया प्रमाणात फटका बसला आहे.</p><p>भाजीपाला पिकवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असून कधी भाव मिळतो तर कधी मिळत नाही अशी परिस्थितीत झाली आहे. दरम्यान शासनाने दखल अवकाळी पाऊस व वातावरणातील बदलाची दखल घेऊन पंचनामे करून शेतकऱ्यांना साहाय्य करून दिलासा द्यावा अशी मागणी माजी आमदार मेंगाळ यांनी जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.</p>