<p>नाशिक | Nashik</p><p>मेगा भरतीसाठी नवीन कंपनी निवड महाआयटीकडे देण्यात आली आहे. जवळपास एक वर्षांपासून ही कंपनी निवड प्रलंबित होती. </p> .<p>मात्र, आता पुढील दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचा अखेर महाआयटीने खुलासा केला आहे.</p><p>साधारण ३२ लाख तरुणांचे भवितव्य अवलंबून असणारी सरळ सेवा भरती प्रक्रिया वेग घेत आहे. या अंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून पुढील दोन दिवसात ती होणार असल्याचे महा आयटीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. </p><p>या पत्रात नमूद केल्याप्रमाणे पुढील दोन दिवसात ही कंपनी निवड झाल्यास, सरळ सेवा भरती प्रक्रियेस वेग येणार आहे. राज्यभरातील असंख्य विभागांची गट क आणि ड पदांची पद भरती या अंतर्गत करण्यात येणार आहे.</p>