<p><strong>नाशिक l Nashik</strong></p><p>द्वारका उड्डाणपूलाकडून पंचवटीतील हिरावाडीत जात असलेल्या महिलेचा मांजाने गळा कापून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि. २८) सायंकाळच्या सुमारास घडली.</p>.<p>हिरावाडीतील रहिवाशी असलेल्या भारती जाधव या दुचाकीवरून हिरावाडीकडे निघाल्या होत्या.</p><p>यावेळी पतंगीचा मांजा अचानक त्यांच्या मानेला अडकल्याने, तीव्र जखम झाली. ही घटना लक्षात येताच जाधव यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.</p><p>मात्र, अतिरक्तस्त्राव आणि गळ्याची जखम मोठी असल्याने उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वारंवार आवाहन करून आणि पोलीसांनी कारवाई करून देखील जीवघेण्या मांजाचा धोका आजही कायम असल्याचे या घटनेतून दिसून आले. </p><p>पोलिसांसह संबंधित यंत्रणांनी मांजा निर्मिती, वाहतूक, विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, तसेच पतंगीसाठी धोकादायक मांजा वापरणाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी केली जाते आहे.</p>