नाशिक । प्रतिनिधी
शेतकरी विरोधी कृषी कायद्याला विरोध करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या उपस्थितीत शेतकरी विरोधी कृषी कायद्यांची होळी करण्यात आली.
कृषी कायद्यांची होळी करत संघटनेतर्फे भारत बंदला सक्रिय सुरुवात केली. केंद्र सरकारने केलेले हे नवे कायदे शेतकऱ्यांना उद्योगपतींच्या घशात घालणारे आहे.
शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे आहे.त्यामुळे ते रद्द झाले पाहिजे .अशी मागणी यावेळी जगताप यांनी केली. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.