नाशिक | Nashik
जिल्ह्यासह शहरात गेल्या दोन दिवसांपासून गारठा (Gartha) कायम असल्याचे पहायला मिळत असून सगळीकडे धुक्याची चादर पसरलेली दिसत आहे...
पहाटेपासून दाटलेले धुके (Fog) सकाळी १० वाजेपर्यंत तसेच असून नागरिक स्वेटर, मफलर, कानटोपी वापरताना दिसत आहे. त्याचबरोबर ढगाळ हवामान व धुरकट वातावरणामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला. तर दाटलेल्या धुक्यांमुळे रब्बी हंगामातील (Rabi season) मका, हरभरा, द्राक्ष आणि कांदा पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मुंबईसह कोकण व उर्वरित महाराष्ट्रात देखील किमान तापमान सरासरीपेक्षा काहीसे घसरलेले असून थंडीचा (cold) प्रभाव कमी अधिक प्रमाणात जाणवत आहे.