जिल्ह्यातील धरणांत ५८ टक्के जलसाठा

गतवर्षी हे प्रमाण ६७ टक्के : आवर्तने सुरु
विसर्ग
विसर्ग

नाशिक । प्रतिनिधी

राज्यासह नाशिकमधून थंडी परतली असून आता उन्हाचे चटके जाणवू लागले आहे. रब्बी व पिण्याच्य‍ा पाण्याच्या आवर्तनामुळे अनेक धरणातील जलसाठयात घट होत आहे. सद्यस्थितित जिल्ह्यातील २४ धरणांत ५८ टक्के जलसाठा आहे. तर हेच प्रमाण गतवर्षी ६७ टक्के इतके होते. उन्हाची दाहकता जशीजशी वाढत जाईल तसे धरणातून पिण्याच्या पाण्यासाठि नियोजीत आवर्तने सोडली जाईल. दरम्यान धरणांत मुबलक पाणीसाठा असल्याने पाण्याची तीव्रता जाणवणार नाही.

मागील दोन वर्षांपासून जिल्ह्यात समाधानकारक पाउस झाला आहे. गतवर्षी गंगापूर, दारणा या मध्यम क्षमतेच्या धरणासह उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण अशी अोळख असलेले गिरणा धरण सलग दुसर्‍या वर्षी शंभर टक्के भरले होते. इतर छोटी मोठी धरणे देखील पाण्याने लबालब भरली होती. मोठया धरणातून विसर्ग सुरु होता. त्यामुळे यंदा दुष्काळाची दाहकता फारसी जाणवली नाही. त्यामुळे मार्च महिना सुरु झाला तरी धरणांत समाधानकारक जलसाठा आहे.

ऐरवी जानेवारी महिन्यापासून ग्रामीण भागात पाण्याची टंचाई जाणवायची. ग्रामीण भागात टॅकरने पाणीपुरवठा केला जायचा. यंदा मात्र दिलासादायक चित्र असून धरणांमध्ये ५८ टक्के इतका जलसाठा आहे. दिवाळीनंतर अनेक धरणांतून रब्बीसाठी आवर्तन सोडण्यात आले. आता पिण्याच्या पाण्यासाठी ठाराविक रोटेशननूसार पाणी सोडले जात आहे. हवामान खात्याने पुढिल काळात तीव्र उन्हाळ्याचा इशारा दिला आहे. त्याची जाणीव होउ लागली असून अनेक ठिकाणी कडक उन पडले आहे. ते बघता नदी, नाले व अोढे कोरडे पडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुढिल काळात पाण्याची मागणी वाढणार आहे. धरणात समाधानकारक जलसाठा असल्याने पाण्याची कमतरता जाणवणार नाही.

धरणनिहाय जलसाठा

गंगापूर - ५४

कश्यपी - ७२

गौतमी गोदावरी - ३७

आळंदी - ६०

पालखेड - २९

करंजवण - ६१

वाघाड - २८

अोझरखेड - ६३

पुणेगाव - ५५

तिसगाव - ५४

दारणा - ७१

भावली - ९१

मुकणे - ६७

वालदेवी - ८९

कडवा - २८

नांदूरमध्यमेश्वर - ९८

भोजापूर - ४५

चणकापूर -६४

हरणबारी - ६३

केळझर - ४६

नागासाक्या - ७३

गिरणा - ५१

पुनद - ८४

माणिकपुंज - ४०

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com