<p><strong>नवापूर । श.प्र. Navapur</strong></p><p>बर्ड फ्लूच्या पार्श्वभुमीवर आतापर्यंत 5 लाख 10 हजार 210 पक्षी तर 18 लाख 77 हजार 845 अंडी नष्ट करण्यात आली आहेत. </p>.<p>तालुक्यातील चोविस पैकी बावीस पोल्ट्री फार्मच्या बर्डफ्लुबाधित कोंबड्यांचे सलग सहाव्या दिवशी कलिंग करण्यात आले. आज बर्डफ्लू प्रभावी दोन पोल्ट्रीतील 1 लाख 30 हजार 754 कुक्कुट पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. </p><p>यात सकीस्मा पोल्ट्रीतील 1 लाख 7 हजार 789 तर जनता पोल्ट्री मधील 22 हजार 965 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. 24 पैकी 22 पोल्ट्री फार्ममधील पोल्ट्रीतील सर्व पक्षी नष्ट करण्यात आले. </p><p>आतापर्यंत 5 लाख 10 हजार 210 पक्षी नष्ट करण्यात आले आहेत. तर 18 लाख 77 हजार 845 अंडी नष्ट करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली.</p>