<p><strong>भुसावळ - Bhusaval - प्रतिनिधी :</strong></p><p>येथील दीपनगर वीज निर्मिती प्रकल्पातील कंत्राटी कागारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ </p>.<p>कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांसाठी भिम आर्मीच्यानेतृत्वात दि. 4 रोजी सकाळी 10 वाजेपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात आले. याबाबत रात्री उशीरापर्यंत प्रशासन व कामगारांमध्ये चर्चा सुरु होती.</p><p>याबाबत साई अंकुर इंटरप्राईजेस कंपनी प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात करोनाच्या पार्श्वभुमीवर कंपनीने कंत्राटी कामगारांना फक्त 13 दिवसांचे वेतन अदा केले. </p><p>याबाबत दीपनगर प्रकल्प प्रशासनाकडे कंत्राटी कामागरांनी साई अंकुर कंपनीचे कामगारांकडे लक्ष होत असल्याबाबत वारंवार लेखी तक्रारी करुन ही प्रशासनाने 4 नोव्हेंबर पर्यंत दखल न घेतल्यामुळे कामगारांनी सकाळी 10 वा. प्रकल्पाच्या 210 मे.वॅ. प्रकल्पाचे मुख्य गेट ते शक्तिगड पर्यंत पायी चालत घोषणाबाजी करत धरणे आंदोलन केले. </p>.<p>दरम्यान, प्रशासनाने चर्चेसाठी कामगरांना कार्यालयात बोलविण्यात आले. मात्र कामगारांनी प्रशासनानेच आंदोलन स्थळी दाखल होत चर्चा करण्याचा आग्रह धरला यामुळे वातावरण काही काळ चिघळले होते.</p><p>दरम्यान सायंकाळी उशिरा चार तासांहून अधिककाळ प्रशासन व आंदोलकांमध्ये चर्चा सुरू होती. अप्रिय घटना टाळण्यासाठी डिवायएसपी सोमनाथ वाघचौरे, पोनि रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.</p><p>कामगारांच्या मागण्या अशा - लॉकडाऊन मधील एप्रिल, मे, जुन या कालखंडात कंपनीकडून अदा न झालेले 26 दिवसांचा पगार द्यावा.</p><p> या काळातील सर्व भत्ते देण्यात यावे. ग्रीलींग व रँकींग नागपूर ट्रान्सपोर्ट कंपनी लेबर सप्लायमध्ये लागू करण्यात यावी तसेच 1 ऑक्टोबर 2020 पासून किमान वेतन कायद्यांतर्गत वेतन अदा करणे आदी मागण्यांचा समावेश आहे.</p>