<p><strong>मुंबई - Mumbai - Jalgaon :</strong></p><p>जळगाव जिल्ह्याचे सुपुत्र तथा बालसाहित्यिक आबा गोविंदा महाजन यांच्या आबाची गोष्टला साहित्य अकादमीचा मानाचा मानला जाणारा पुरस्कार जाहीर झाला आहे.त्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.</p>.<p>आबा महाजन हे महसूल खात्यात अधिकारी आहेत. त्याच सोबत लेखकही आहेत. प्रामुख्याने बालसाहित्यासाठी त्यांची ख्याती आहे. त्यांची 13 पुस्तके व 8 पोस्टरकविता प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना राज्य शासनाचे 3 पुरस्कार मिळाले आहेत</p><p>आबा महाजन यांचे बालकथा. बालकादंबरी, बालकविता, बालनाट्य व मुलांसाठी ललित लेखन असे बालसाहित्यातल्या सर्व प्रकारांचे लेखन प्रकाशित आहे.</p>.<p>मन्हा मामाना गावले जाऊ हा महाराष्ट्रातील पहिला अहिराणी बालकविता संग्रह त्यांच्या नावावर आहे. अहिराणी व मराठी असा द्वैभाषिक प्रयोग या पुस्तकात केला आहेत्यांचा मन्हा गावले हा दुसरा संपूर्ण अहिराणी बाल-कुमार कवितासंग्रह असून हा कवितासंग्रह नांदेड विद्यापीठात एम ए च्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहे.</p><p>त्यांच्या अनेक कथा/कविता इतर भाषांत अनुवादित झाल्या असून त्यांपैकी काहींचा पाठ्य पुस्तकांत, विद्यापीठ अभ्यासक्रमांत समावेश झाला आहे. देशभरात प्रतिष्ठेचे मानले जाणारे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.</p>.<p>यंदा दोन मराठी लेखकांना हे पुरस्कार पटकावण्यात यश आले आहे. मराठीमध्ये नंदा खरे -कादंबरी उद्या आणि आबा महाजन- आबाची गोष्ट (बालसाहित्य) या दोन लेखकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.</p>