<p><strong>जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :</strong></p><p>गत वर्षातच नव्हेतर गेल्या काही वर्षापासून महावितरणच्या वीज ग्राहकांची वीजबिल थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. </p>.<p>त्यामुळे महावितरणचा आर्थिक डोलारा सांभाळणे कठीण आहे. त्यामुळे महावितरण अधिकारी कर्मचार्यांनी थकीत वीज वसुलीसाठी अधिक कार्यक्षमतेने कामकाज करून 100 टक्के वसुली करावी. </p><p>या कामात अकार्यक्षम कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी असे निर्देश महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी दिले.</p><p>जळगाव परिमंडळ कार्यालयात महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली जळगाव परिमंडळांतर्गत जळगाव, धुळे व नंदुरबार मंडळातील अधिकार्यांची वीजबिलांची थकबाकी व वसुलीचा आढावा बैठकीत ते बोलत होते. </p>.<p>सर्वसाामान्य वीज ग्राहकांशी सौजन्य, समाधानकारक सेवेसह वीजगळती, वीजबिलांची थकबाकी नियंत्रण आणणे गरजेचे आहे.अन्यथा त्याचा परिणाम दैनदिन सेवांवर होऊ शकतो.</p><p>थकीत व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांची वीजबिले वसुली अथवा वीजपुरवठा खंडित करा. महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती शेतकर्यांपर्यंत पोचवून जास्तीत जास्त शेतकर्यांना या सवलतीची माहिती देऊन थकबाकीमुक्त होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देशही बोडके यांनी दिले.</p><p>यावेळी मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रकाश पौणिकर, अनिल बोरसे, चंद्रशेखर मानकर, प्रादेशिक कार्यालयाचे उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार आदि कार्यकारी अभियंते, अधिकारी उपस्थित होते.</p>