महापौरांनी लोकसहभागातून स्मशानभूमीत तयार करून घेतले ७ ओटे

स्वतः उभे राहून तातडीने करून घेतले बांधकाम
महापौरांनी लोकसहभागातून स्मशानभूमीत तयार करून घेतले ७ ओटे

जळगाव - Jalgaon :

शहरात करोना रुग्णांची संख्या वाढत असून, कोरोनामुळे व कोरोनासदृश आजारामुळे शहरात दिवसाला अनेक मृत्यू होत आहेत.

यामुळे शहरातील नेरी नाका स्मशानभूमीत मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शिल्लक राहत नसल्याने, अनेकांना खाली अंत्यसंस्कार करावे लागत आहेत.

ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत जात असल्याने, या स्मशानभूमीत लोकसहभागातून महापौर जयश्री महाजन यांनी ७ ओटे तयार करून घेतले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com